Nuksan Bharpai List 2023: राज्य सरकारची मोठी घोषणा, राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना मिळणार 150 कोटी रुपये पीक विमा; हेक्टरी एवढी मदत

Nuksan Bharpai List 2023 : केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. या योजनेअंतर्गत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान झाल्यास विमा देत असते. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मागील वर्षी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानपोटी शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून आर्थिक मदत दिली जाते.

           अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानपोटी मे, जून 2023 मध्ये 37,000 ते 40,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली. 

          Crop Insurance मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे एकूण 15 लाख 57 हजार 971 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. 



           मागील महिन्यात 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांना 1500 कोटी मदत निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तातडीने जमा करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

          राज्यात 5 एप्रिल 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने सतत पाऊस ही एक नवीन शोकांतिका मानून ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि आवश्यकतांच्या अनुषंगाने पीक नुकसानीसाठी मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना नुकसानपोटी एवढी मदत मिळणार..

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – 8,500 रुपये प्रति हेक्टरी
बागायत पिकांच्या नुकसानपोटी – 17,000 रुपये प्रति हेक्टरी
बारामाही पिकाच्या नुकसानीसाठी – 22,500 प्रति हेक्टर
शेतकऱ्यांना एवढी मदत दिली जाणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल बारामाही पिकांच्या नुकसानीसाठी 45,000 रुपये आर्थिक मदत मिळेल तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 34,000 रुपये तुम्हाला दिले जातील.

या जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

1. अहमदनगर जिल्हा – लाख 92 हजार 751 शेतकरी – 241 कोटी रुपये निधी
2. अकोला जिल्हा – 1 लाख 33 हजार 656 शेतकरी – 86 कोटी 72 लाख रुपये
3. अमरावती जिल्हा – 2 लाख 3 हजार 121 शेतकरी – 129 कोटी 57 लाख रुपये निधी
4. छत्रपती संभाजीनगर जिल्हा (औरंगाबाद) – 4 लाख 1 हजार शेतकरी – 226 कोटी 98 लाख रुपये निधी
5. बीड जिल्हा – 4 लाख 37 हजार 688 शेतकरी – 195 कोटी 3 लाख रुपये नुकसान भरपाई
6. बुलढाणा जिल्हा – 2 लाख 38 हजार 323 शेतकरी – 114 कोटी 90 लाख रुपये आर्थिक मदत
7. जळगाव जिल्हा – 62 हजार 859 शेतकरी – 45 कोटी 14 लाख रुपये आर्थिक सहाय्य
8. नागपूर जिल्हा – 6 कोटी 23 लाख रुपये निधी मंजूर
9. नाशिक जिल्हा – 1 लाख 12 हजार 743 – 25 कोटी 83 लाख रुपये नुकसान भरपाई
10. धाराशिव जिल्हा (उस्मानाबाद) – 16,013 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
11. वाशिम जिल्हा – 63 हजार 716 शेतकरी – 39 कोटी 98 लाख रुपये अनुदान
12. सोलापूर जिल्हा -49 हजार 168 शेतकरी – 46 कोटी 89 लाख रुपये निधी मंजूर